पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे सध्या श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा हा श्रीनगरचा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. हल्ल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात ओवैसी यांनी स्थानिक नेते आणि नागरिकांशी संवाद देखील साधला आहे. यावेळी प्रसार माध्यमांना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्वाची बैठक सुरू आहे. सध्या दिल्लीत बैठकांच सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही आणखी एक महत्वाची बैठक पार पडत आहे. डोवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ही बैठक तब्बल 40 मिनिटं चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 27 पर्यटकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर … Read more

मुख्यमंत्री राबवणार यशवंत विद्यार्थी योजना

यशवंत विद्यार्थी योजनाराज्यात आता धनगर समजातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे धनगर समाजातील 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा आज वाढदिवस आहे. कालच राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात वैभवीने उत्तम यश मिळवल आहे. तर आज वाढदिवस असल्याने वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. राज्यभरातून तिच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक भागातून तिला पुष्पगुच्छ आणि गिफ्ट पाठवण्यात आलेले आहेत. या … Read more

ओबीसींचं आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र आता हा तिढा सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ओबीसींच्या जागा कमी न करता या … Read more

राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रिम कोर्टाचा आदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. “आधीच्या परिस्थितीनुसार १९९४ ते २०२२ च्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील. राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबरच्या … Read more

कोस्टल रोडवर भीषण अपघात

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोस्टल रोडवर सुसाट वाहनांवर आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचे मोठे … Read more

1995 सालीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार होते… गणेश नाईक यांचे जुन्या आठवणीला उजाळा

नवी मुंबईचे माजी आमदार गणेश नाईक यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि धीरूभाई अंबानी यांच्याबदद्लचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच राजकीय रहस्ये उघड केली आहे. “धीरूभाई अंबानी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते. ते सी विंड – कफ परेड येथे धीरूभाई … Read more

सोने ७ हजारांनी खाली घसरले : गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ?

काही दिवसांपूर्वी भारतात सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढे गेला होता. आता मात्र सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आजदेखील सोन्याचा भाव घसरला आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,510 रुपये प्रति दहा ग्रॅम रुपये आहे. तुलनाच करायची … Read more

चोराच्या उलट्या बोंबा…पाकिस्तानने भारतावर केला आरोप

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले. पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने आता नवीन कांगावा सुरू केला आहे. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्ताने सुरू केला आहे. अर्थात त्यांच्या या कोल्हेकुईचा जागतिक मंचावर काहीच … Read more