जिथं 26\11च्या कसाबला प्रशिक्षण, त्या ट्रेनिंग कॅम्पला भारतानं केलं उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, मुरिदकेमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर मुरिदकेमधील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यावरून भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद पाकड्यांच्या चांगलीच लक्षात आली असेल. मरकज तैयबा हे मुरीदके येथे आहे, … Read more

पाकिस्तानमधील 12 शहरांवर 50 ड्रोन हल्ले

पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांवर 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

भारताकडून पाकिस्तानला दणका, लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त

पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये अफरातफरी, गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या कराची, बहावलपूर, चकवालमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच शेखुपुरा, नरवाल, रावलपिंडी, घोटकी अट्टोक अशा 13 शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. तसेच लाहोरच्या विमानतळाजवळ देखील बॉम्बस्फोट करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरुच आहे. भारताच्या एअर स्ट्राईकला मोठं यश, दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ रऊफ … Read more

दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहांची रांग

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याचे मुख्यालय नष्ट झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत जावून बहावलपूर येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचा अड्डावर कारवाई केली. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहर याची मोठी बहीण, तिचा पती, त्याचे भाचे, पुतणे अन् इतर नातेवाईक मारले गेले आहे. 1999 मध्ये मसूद … Read more

ऑपरेशन सिंदूरला जगाचा पाठिंबा…

अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनद्वारे भारताने अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानमध्ये शिरकाव न करता, आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अचूक नेम साधत भारताने अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे भारताने या फक्त अतिरेक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. तसेच पाकिस्तानी सैन्यावरही हल्ला केला नाही. त्यामुळे … Read more

जाणून घ्या भारत पाक युद्धात कोणते देश कोणाच्या बाजूने..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर  भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून … Read more

महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढला असून  युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्यार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व … Read more

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने भारतीय शेअर मार्केट पुन्हा हादरले

भारतीय शेअर बाजारात आज औषध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. भारतातील औषध कंपन्यांच्या स्टॉक्समधील घसरणीचं कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक आदेश आहे. निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये 1.4 टक्के घसरण पाहायला मिळाली. ल्यूपिनमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला. अरबिंदो फार्माचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. सिप्लाचा स्टॉक 2 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. … Read more

मालाड पिंपरिपाड्यात रस्त्याचे तीन तेरा, वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचे  दुर्लक्ष

मुंबईतील मालाड विभागात पिंपरी पाडा भाजी मार्केट ते क्वीन मेरी शाळपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मुंबई महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. जे अजून देखील पूर्ण न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. तसेच,२००७ पासून हा रस्ता बनविण्यात आला नव्हत, असा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सध्या रस्त्याचे खोदकाम करुन ठेवले आहे. पण रस्त्याच्या कामात कुठेही … Read more

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा आता भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर आहे. चीचावतनी, पट्टोकीमार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर हा ताफा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडून पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांचा सिलसिला सुरू आहे, तर दुसरीकडे भारताकडून मात्र पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे … Read more