वाल्मिक कराड प्रकरणात निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेच्या केंद्रस्थानी आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड हा प्रमुख आरोपी आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. दरम्यान, सध्या तो तुरुंगात असताना एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात … Read more

आदित्य ठाकरेंना मनसेला भाजपची बी टीम म्हणत टिकास्त्र सोडले

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत त्यांनी मनसेवर देखील निशाणा साधला, ते कांदिवलीमध्ये आयोजित मराठीची पाठशाळा या कार्यक्रमात बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात  राधे राधे, हर हर महादेव, जय श्री राम या घोषणेनं केली. यावेळी बोलताना आदित्य … Read more

संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आलेली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही, असंही निरुपम म्हणाले आहेत. याचवेळी बोलताना निरुपम यांची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं आहे. संजय राऊत यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महायुती सरकारवर टीका केली जाते.  त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राऊत यांच्याविषयी … Read more

अजितदादांकडून पुन्हा एकदा थोरल्या पवारांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव

पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यनी म्हंटलं आहे. मी देखील माझ्या परीनं विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. बारामतीच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आज अजित पवार आहेत. यावेळी आयोजित एका सभेत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. राज्याचं, जिल्हयाचं भलं व्हावं हीच … Read more

शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवींची नियुक्ती

आपलं लक्ष्य बीएमसी आहे. त्यासाठीच सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. सुधीर साळवी यांची सचिव पदावर नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष्य आता बीएमसी असल्याचं विधान केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे … Read more

दानवे आणि खैरेंनी संभाजीनगरला अधोगतीकडे नेत आहेत संदीपान भूमरेंची टीका

चंद्रकात खैरे यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावीत, असं संदीपान भूमरे यांनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता असल्याची टीका देखील यावेळी भूमरे यांनी केली आहे. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी आता संभाजीनगर जिल्ह्याची वाट लावली असल्याचं सुद्धा संदीपान भूमरेंनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे यांनी स्वत: केलेलं काम दाखवावं असं म्हणत संदीपान … Read more

अंबादास दानवेंचे गुलाबरावांना खडे बोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी … Read more

अशोक चव्हाणांचा रोहित पवारांवर हल्ला बोल

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदर अशोक चव्हाण, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आमदार बाबुराव कदम, भाजपाचे आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती.  धनगर समाज व महायुतीच्या वतीनं या सत्काराचं आयोजन करण्यात आलं, या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते अशोक चव्हाण यांनी … Read more

राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं

राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे,  गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरली लावली आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आहे, जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस … Read more

आज रायगडावर उदयनराजेंच्या चार पाच प्रमुख मागण्या

“शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला होता” असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी … Read more