उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याची घोषणाही लवकरच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्ष युती आणि आघाड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भेटीगाठीही वाढल्या आहेत. असे असतानाच विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्येही हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव … Read more

वानखेडे स्टेडियमचा नामकरण सोहळा

वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचं नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. तीन स्टँडला दिग्गजांची नावं देण्यात आली. रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव स्टँडला देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवि शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर … Read more

गुलाबराव पाटील संजय राऊतांवर कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या  ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर … Read more

भाजपचा आणखी एक नेता बरळला

ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र भारत पाकिस्तान तणावादरम्यान, भारताची बाजू मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर आता मध्य प्रदेशच्याच उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नवा वाद … Read more

नीलम गोऱ्हे यांचे लाडका बहिणी संदर्भात मोठं वक्तव्य

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र जर आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीकडून करण्यात आली होती, मात्र अजूनही … Read more