अशोक चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ? दिला स्वबळाचा इशारा

निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.  स्वबळाचा अप्रत्यक्ष नारा देत खासदार चव्हाण यांचे मित्र पक्षाला आव्हान ?  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा क्रमांक एक वर राहिला पाहिजे. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा भाजपा प्रमाणे बारकाईने काम करत होतो, म्हणून भाजपात ॲडजेस्ट व्हायला वेळ लागला नाही. आम्हाला लोकांमध्ये चालणार नाणं पाहिजे, माझी बॅग उचलतो, मागे पुढे … Read more

कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार नाल्यात पलटली अन् 2 जण गंभीर जखमी

कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार रस्त्यावरून घसरून नाल्यात पलटून दोघे जखमी झाले. रस्त्याच्या कडेला भराव नसल्यामुळे कारचा अपघात झाला.  चालक आणि लहान मुलगी कार मध्ये अडकली. रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चालक आणि चिमुकलीला वाचवले. अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

Ai च्या मदतीने एका कूकने लिहिली मिस्टर इंडिया 2 ची स्क्रिप्ट

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज (1 मे ) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं.शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली. बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर … Read more

शिखर धवनने दिली जाहिर प्रेमाची कबुली

शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली असेल, पण प्रेमाच्या मैदानावर त्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. शिखर धवनला एक नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे, जिच्याबद्दल त्याने संपूर्ण जगाला जाहीरपणे सांगितले आहे. ही मुलगी म्हणजे सोफी शाइन, जी बऱ्याच काळापासून शिखर धवनसोबत दिसत होती. शिखर धवनने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत ज्यामध्ये त्याने स्वतःचा आणि … Read more

पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर संतप्त

पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीमेवर फक्त प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही, तर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग असून बहुसंख्य काश्मीरी भारतीय असल्याचा त्यांनी दावा केला. ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर हेही पहलगाम हल्ल्यानंतर भयानक संतापले असून बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका , … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणांना खास आवाहन

भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी तरुण क्रिएटर्सना खास आवाहन केलं. “आपल्याला माणसांना रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि … Read more

उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिटही चमकत आहे – पंतप्रधानांचे गौरवोद्गार

रशियात राज कपूर यांची लोकप्रियता, कानमध्ये सत्यजित रे यांची लोकप्रियेता आहे. ऑस्करमध्ये तेच दिसतं. गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचं सोशल रिफ्लेक्शन असो. ए. आर. रहमान यांचं संगीत असो की राजामौलींची महागाथा असो प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र … Read more

राज आणि उद्धव यांच्या युतीच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचे भाष्य..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ठाकरे आणि पवारांचे सहा दशकांचे प्रेमाचे संबंध आहेत. त्यांनी टोकाची राजकीय भूमिकासुद्धा घेतलेली आहे. परंतु कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूने जपले गेले आहेत. ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही मला भावासमान आहेत. … Read more

छाया कदमची वनविभागाकडून चौकशी

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री छाया कदम सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे अडचणीत सापडली आहे. छाया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेनं ठाण्यातील वन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. “मी रानडुक्कर, ससा, घोरपड साळिंदर अशा प्राण्यांचं मांस खाल्लंय”, असं … Read more

सीमेवर सध्या प्रचंड तणाव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल असा पाकिस्तानकडून कांगावा केला जातोय. सीमेवर प्रचंड तणाव आहे. फायटर जेट्सचा आवाज ऐकू येतोय. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF आणि पंजाब पोलिसांनी मिळून हे ऑपरेशन केलय. अमृतसरमधील भारोपाल गावातून मोठ्या प्रमाणात … Read more