Home » Uncategorized » RATNAGIRI | आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या पतितपावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक

RATNAGIRI | आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या पतितपावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक

इयत्ता आठवीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या चुकीच्या इतिहासावरून रत्नागिरीतील भंडारी समाज आक्रमक.तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी भंडारी समाज उपोषण करणार. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर सावरकरांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पुस्तकात असल्याचे भंडारी समाजाचे मत.प्रत्यक्षात भागोजीशेठ किर यांनी स्वतंत्र वीर सावरकर यांच्या विनंतीवरून पतित पावन मंदिर बांधले होते पतितपावन मंदिर बांधण्याचा शिलालेखातही उल्लेख आहे.स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी आम्हाला आदर पण चुकीचा इतिहास नव्या पिढी समोर जाऊ नये यासाठी हा प्रयत्न, भंडारी समाजा जिल्हा अध्यक्ष राजीव किर यांनी व्यक्त केली भावना.

Leave a Comment