भारत पाकिस्तानातील तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहलगाम हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान बिथरला आहे. सध्या पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरु आहेत. पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा डाव भारताने उधळून लावला आहे.

पाकिस्तानने आज पाच राज्यांना टार्गेट करण्यात आले. यात जम्मू, काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे. यात नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि विमानतळांवर हल्ला करण्यात आला. यावेळी भारताच्या पाच राज्यांमधील २० शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला.
तसेच सध्या पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले.
या राज्यांमधील २० शहरांना पाकिस्तानकडून टार्गेट
जम्मू
सांबा
उरी
पुंछ
पठाणकोट
बारामुल्ला
कुपवाडा
राजौरी
अवंतीपुरा
नौशेरा
अखनूर
तंगधार
जैसलमेर
उत्तरलाई
फलौदी
अमृतसह
फिरोजपूर
बाढमेर




Users Today : 38