जम्मू-काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. रामबनमध्ये भूस्खलन झाल्याने यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भूस्खलनामुळे रामबन भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक नद्यांना पुर आल्यामुळे नागरीवस्तीत सुद्धा पाणीचपाणी झालं आहे.

जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारची सकाळ येथील लोकांसाठी भयावह ठरली आहे. या लोंढ्यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.



