मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांना फोन केला आहे. नांदेडच्या शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केला आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शहीद वनंजेंच्या कुटुंबाला धीर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. देशासाठी सचिन … Read more

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमवाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संपूर्ण जम्मू काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे. सोमवारी … Read more

राज्य सरकारचा कृत्रिम वाळू धोरणाबाबत मोठा  निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पण धोरण आखण्यात आले. राज्यातील … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्याचा परिणाम हा फक्त विध्वंस हाच असेल, असं मोदी यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर … Read more

बलुचिस्तानची पाकिस्तानला संपविण्यासाठी भारताकडे मदतीची हाक

भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूचिस्तानातील फायटर्सनी पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे. आम्ही त्याला नष्ट करु असं बलूच फायटर्सनी म्हटलं आहे. त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे. भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या, तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू असं BLA ने म्हटलय. द बलूचिस्तान पोस्टनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर … Read more

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खुद्द शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक फूट … Read more

उद्या जाहीर होणार दहावीच्या निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, … Read more

‘सनम तेरी कसम’च्या इंदरची पुन्हा सरू सोबत काम न करण्याची शपथ

भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष वाढत असताना अभिनेता हर्षवर्धन राणेनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जर पहिल्याच भागातील कलाकार घेतले तर काम करणार नसल्याचं त्याने जाहीर केलंय. 2016 मध्ये हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजही … Read more

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांनी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी १९,२४४ कोटींचा ऐतिहासिक करार

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी आज तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. सुमारे 19,244 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज भोपाळ येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची … Read more

संजय राऊत डोनाल्ड ट्रम्पवर कडाडले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका … Read more