सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या “पहलगाम मध्ये दुखत घटना घडली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्या ठिकाणी 1 मे ला नागरिक शौर्य म्हणून पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. ही वेळ टीका करण्याची वेळ नाही आम्ही भारत सरकार बरोबर आहोत. भारत सरकार योग्य पाऊल टाकेल असा विश्वास आहे.” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पत्रद्वारे मुख्यमंत्र्यांना काय विनंती केली आहे त्याबद्दल खुलासा केला आहे.

[democracy id="1"]


