भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूचिस्तानातील फायटर्सनी पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे. आम्ही त्याला नष्ट करु असं बलूच फायटर्सनी म्हटलं आहे. त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे. भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या, तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू असं BLA ने म्हटलय. द बलूचिस्तान पोस्टनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूच फायटर्सनी एक स्टेटमेंट जारी केलय. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाळतो. त्यांच्यासोबत कूटनीतिक संबंध मूर्खपणा आहे असं बलूच फायटर्सनी सांगितलं. भारताने पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू असं बलूच लिबरेशन आर्मीच म्हणणं आहे.

[democracy id="1"]


