कुणाल कामराने लिहिले ‘बुक माय शो’ला पत्र

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्यानंतर कुणाल कामरावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. त्यानंतर कुणाल कामरावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली असताना कुणाल कामराचे शो बुक माय शो अॅप्लिकेशनवरून हटवण्यात आले होते. मात्र यासंदर्भात कुणाल कामरा याने … Read more

भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं

वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना देवळीतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. जानवं आणि सोवळं घातलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, असं सांगत प्रवेश नाकारण्यात आल्याचं भाजपचे माजी खासदार रामदास तडस म्हणाले आहेत. देवळीत रामदास तडस यांच्या घराच्या जवळ फार जुनं राम मंदिर आहे. इथं मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर स्टीलचा कठडा आहे. त्या कठड्याला … Read more

दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद अर्ध्यात सोडली

आमच्याकडे डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. मात्र डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी 10 लाख रुपयांचं डिपॉझिट नमूद केलं, असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलंय. काही दिवसांपूर्वी येथे ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागण्यात आली होती. त्यानंतर या महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला … Read more

उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी नेते तयारीला लागले

उत्तर प्रदेशमध्ये 2027 साली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी आतापासूनच चालू झाली आहे. सध्या विरोधी बाकावर बसलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव ही निवडणूक जिंकण्यासाठी 90-10 च्या फॉर्म्यूल्यावर आपली रणनीती आखत आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 80-20 या फॉर्म्यूल्यावर जोर दिलाय. याच पार्श्वभूमीवर या फॉर्म्यूल्यांचा अर्थ काय? तसेच उत्तर प्रदेशची … Read more

महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप…

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र हे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळून लावलं होतं. मात्र त्यानंतर महादेव गित्ते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली, यावरून महादेव गित्तेच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला … Read more

ट्रम्प यांच्या धोरणामुळे आज शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार उघडला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्समध्ये 3000 हून अधिक अंकांची घसरण झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1000 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. टाटा मोटर्सपासून ते माझगाव डॉकपर्यंतचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात झपाट्याने घसरले. भारताप्रमाणे आशियाई शेअर बाजारसुद्धा मोठ्या घसरणीसह उघडले. जपान, हाँगकाँग, … Read more

संजय राऊतांची राज ठाकरेच्या मराठी आंदोलनावर प्रतिक्रिया

मनसे नेते राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी बोलले जात नसल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरु करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात दिले होते. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी बँकांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले होते. आता दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पत्र काढून आंदोलन थांबवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. … Read more

गोष्ट अमेरिकेच्या महामंदीची…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2 एप्रिलची घोषणा जगासाठी एक नवीन संकट घेऊन आली आहे. ट्रम्प यांनी 180 पेक्षा अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Deducted Reciprocal Tariff) लावला आहे. यामुळे फक्त अमेरिकाच नाही, तर आशियाई बाजारापासून युरोपियन बाजारात मोठी पडझड पहायला मिळत आहे. जगभरातील शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. जगातील मजबूत अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु … Read more

मुसलमान RSS जॉईन करू शकतात का? यावर मोहन भागवतांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे( RSS) प्रमुख मोहन भागवत हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर गेले होते. त्याच वेळी त्यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावर भागवतांनी दिलेल्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुसलमान हे आरएसएस जॉईन करू शकतात का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मोहन भागवतांनी पहिल्यांदाच या विषयावर उत्तर दिलं. नेमकं काय म्हणाले मोहन भागवत ? … Read more

पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारताचे भय

पाकिस्तान सरकारने भारताची चांगलीच धास्ती घेतली आहे. भारताच्या दहशतीमुळे पाकिस्तानने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाकिस्तान सरकारने काश्मीरजवळ स्वात खोऱ्यात असलेल्या विमानतळाला लष्करी अड्डा बनवण्यास सुरुवात केली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या ठिकाणी फायटर जेट विमाने ठेवण्यासाठी शेल्टर बनवले जात आहे. तसेच धावपट्टीचा विस्तारही केला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रन्सपोर्ट … Read more