ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची बाजू मांडण्यासाठी भारतातील खासदारांचं शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावर जाणार आहे. खासदारांचे आठ गट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक गट जगातील महत्त्वाच्या देशात जाऊन आपली बाजू मांडणार आहे. आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यासाठी भाजपने खासदारांचे गट तयार केले आहेत. विरोधकांकडून प्रतिनिधी मंडळासाठी खासदारांची नावे मागवण्यात आली होती. खासदाराच्या एका गटात भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर यांच्या नावाचा समावेश केला आहे. या शिष्टमंडळात निवड केल्याबद्दल थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर काँग्रेसने मात्र, थरूर यांचे नाव शिष्टमंडळात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. काँग्रेसने थरूर यांचं नावच दिलं नव्हतं, तरीही भाजपने त्यांच्या नावाचा समावेश केल्याने भाजपच्या या खेळीने काँग्रेसला धक्का बसला आहे.

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?



Users Today : 6