बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 2 वर्षात मिळविली 100 बक्षिसे…
उरण मधील 9 वर्षीय आराध्या विनोद पुरो हीने बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुंबई, मुंबई उपनगरांसह ठाणे, रायगड , कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षीसांचे शतक गाठले आहे. तिच्या या यशानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळत असल्याच्या भावना तिच्या आई वडिलांनी व्यक्त केल्या आहेत. आराध्याला पुढे ग्रँड मास्तर बनून देशाचे नाव उज्वल करायचे असल्याचे तीने सांगितले.




Users Today : 25