नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर पसरलेली अस्वछता, रेल्वे स्थानक परिसरात भिकाऱ्यांचे वाढलेले वास्तव्य त्याचबरोबर मद्यपींचे कुठेही बिनधास्तपणे मद्यप्राशन करणे या आणि बऱ्याच समस्यांना नवी मुंबईकरांना सामोरे जावे लागते. या समस्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचे रेल्वे स्थानकांबाबत त्यांचे मत व त्यांना असणाऱ्या समस्या मांडू शकतात. आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्र दिले असून रेल्वे स्थानकावरील समस्या सुटल्या नाहीत तर आंदोलन करणार असल्याचे आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी सांगितले आहे.




Users Today : 24